देवेंद्र फडणवीसांमुळेच पूररेषेचा गोंधळ आणि नागरिकांना पुराचा फटका, मेधा पाटकरांचा आरोप

मुंबई तक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पूररेषेचा गोंधळ झाला असूनह नागरिकांना पुराचा फटका बसला असा आरोप आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कोल्हापुरात केला आहे. मेधा पाटकर या सामाजिक कार्यकर्त्या, पर्यावरण अभ्यासक आहेत. त्यांचं नर्मदा बचाव आंदोलन देशभर गाजलं होतं. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका केली आहे. नेमकं काय म्हणाल्या मेधा पाटकर? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पूररेषेचा गोंधळ झाला असूनह नागरिकांना पुराचा फटका बसला असा आरोप आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कोल्हापुरात केला आहे. मेधा पाटकर या सामाजिक कार्यकर्त्या, पर्यावरण अभ्यासक आहेत. त्यांचं नर्मदा बचाव आंदोलन देशभर गाजलं होतं. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या मेधा पाटकर?

‘पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईन पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला. शिवाय निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत..मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे’ असंही मेधा पाटकर म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp