बीड: ‘रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या..’ धनंजय मुंडेंनी कोणाला लगावला खोचक टोला?

मुंबई तक

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या.’ असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांनी यावेळी नाव न घेता पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. अंबाजोगाई पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या.’ असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांनी यावेळी नाव न घेता पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. अंबाजोगाई पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘सगळी कामं अर्धवट सोडून दिली. जर यांनी ती कामं पूर्ण केली असती तर आम्हाला ती कामं पूर्णत्वास न्यायची जबाबदारी नसती.’ असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

‘रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या. कोव्हिडचं संकट असताना सुद्धा केंद्राचा हिस्सा दोन वर्षात आला नाही. पण मी बीड जिल्ह्यातील मदत थांबू दिली नाही. म्हणून मी अगदी जबाबदारपणे सांगतोय नगरहून आष्टीपर्यंत येत्या 28, 29, 30 डिसेंबर रोजी ट्रायल चालू होणार आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp