ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?

मुंबई तक

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन वर्ष कालावधी लोटला आहे. हा प्रयोग यशस्वी होईल की नाही अशी चर्चा करणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे. मात्र या सरकारसोबतच महाराष्ट्रात आणखी एक नाव कायमच चर्चेत राहिलं आहे आणि ते नाव आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यातून विस्तवही जात नाही हे महाराष्ट्रानं गेल्या वर्षभरात अनेकदा पाहिलं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन वर्ष कालावधी लोटला आहे. हा प्रयोग यशस्वी होईल की नाही अशी चर्चा करणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे. मात्र या सरकारसोबतच महाराष्ट्रात आणखी एक नाव कायमच चर्चेत राहिलं आहे आणि ते नाव आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यातून विस्तवही जात नाही हे महाराष्ट्रानं गेल्या वर्षभरात अनेकदा पाहिलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारल्याची जी बातमी आली त्यानंतर या मतभेदांची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. आपण आता जाणून घेणार आहोत राज्यपाल विरूद्ध ठाकरे सरकार असं किती वेळा घडलंय?

कशी झाली संघर्षाची सुरूवात?

काँग्रेसचे नेते के.सी. पडवी हे मंत्री म्हणून शपथ घेत होते. त्यावेळी त्यांनी शपथ घेताना काही ओळी आपल्या मनाने जोडल्या. यावरून राज्यपाल भगत सिंह हे पडवी यांच्यावर चिडले होते. मी सांगतो आहे त्याच भाषेत आणि तेवढीच शपथ घ्यायची आहे. आपल्या मनाची वाक्य शपथेत घ्यायची नाही असं म्हणत राज्यपालांनी के.सी. पडवी यांना झापलं होतं. एवढंच नाही तर त्यांना शपथ पुन्हा वाचायला लावली होती. हीच सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष रंगणार याची सुरूवात होती

हे वाचलं का?

    follow whatsapp