त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथांची वारी रद्द, वारकर्‍यांमध्ये नाराजी

मुंबई तक

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथे जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होणारी संत निवृत्तिनाथांची पौष वारी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वारकर्‍यांमध्ये नाराजी आहे. गतवर्षीही कोरोनामुळे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण राज्यभरात वाढू लागले आहेत. त्यामुळे त्र्यंबक उपविभागीय अधिकार्‍यांनी पौष वारीसाठी नियमावली जाहीर केली आहे. श्री. संत निवृत्तिनाथ यात्रा दरवर्षी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथे जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होणारी संत निवृत्तिनाथांची पौष वारी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वारकर्‍यांमध्ये नाराजी आहे. गतवर्षीही कोरोनामुळे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण राज्यभरात वाढू लागले आहेत. त्यामुळे त्र्यंबक उपविभागीय अधिकार्‍यांनी पौष वारीसाठी नियमावली जाहीर केली आहे.

श्री. संत निवृत्तिनाथ यात्रा दरवर्षी पौष वद्य एकादशीला भरत असते. यावर्षी 25 ते 29 जानेवारी रोजी पौष वारी आहे. या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून किमान पाच लाख वारकरी, भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात. तर जवळपास 500 च्या आसपास पायी दिंड्या येत असतात.

काही दिंड्यांना शेकडो वर्षांची परंपराही आहे. पण यावेळी मात्र कोरोनामुळे ही पौषवारी रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी यांसदर्भात नियमावलीही जाहीर केली आहे.

अशी आहे नियमावली

हे वाचलं का?

    follow whatsapp