Maharashtra Flood 2021 : पुरामध्ये भिजलेली/खराब झालेली कागदपत्रं परत कशी मिळवणार? समजून घ्या

मुंबई तक

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर ओसरलाय, पण नुकसान भरून काढणं काही दोन-चार दिवसांचं काम नाहीये….आर्थिक नुकसान तर झालंच आहे, पण राहण्या आणि खाण्या-पिण्याचीही भ्रांत अनेकांसमोर आहे. या पुराच्या पाण्यात अनेकांची महत्वाची कागदपत्रही वाहून गेलेली असू शकतात, किंवा पाण्यात भिजल्याने खराब झाली असू शकतात. मग सातबाऱ्याचे उतारे, रेशन कार्ड, आधार-पॅन कार्ड, जन्म-मृत्यूचे दाखले, बँकेची कागदपत्र परत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर ओसरलाय, पण नुकसान भरून काढणं काही दोन-चार दिवसांचं काम नाहीये….आर्थिक नुकसान तर झालंच आहे, पण राहण्या आणि खाण्या-पिण्याचीही भ्रांत अनेकांसमोर आहे. या पुराच्या पाण्यात अनेकांची महत्वाची कागदपत्रही वाहून गेलेली असू शकतात, किंवा पाण्यात भिजल्याने खराब झाली असू शकतात. मग सातबाऱ्याचे उतारे, रेशन कार्ड, आधार-पॅन कार्ड, जन्म-मृत्यूचे दाखले, बँकेची कागदपत्र परत कशी मिळवायची? त्यासाठीची तक्रार किंवा अर्ज कुठे दाखल करायचे या सगळ्याची माहिती आज तुम्हाला आम्ही देणार आहोत…

सातबाऱ्याचे उतारे

सगळ्यात पहिले ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्वाचं ते म्हणजे सात-बाऱ्याचे उतारे. तसे सातबाऱ्याचे उतारे हे तहसील कार्यालयातच असतात, फक्त त्यासाठी एक सर्व्हे नंबर असतो. तो सर्व्हे नंबर दिला, तर तहसील कार्यालयातून तुम्हाला उतारे मिळू शकतात. आता हा सर्व्हे नंबर तुमच्याकडे नसेल, आठवत नसेल तरी घाबरून जाण्याची गरज नाही. पुराच्या स्थितीत तुमचं नाव सांगूनही तहसील कार्यालयातून तुम्हाला सातबाऱ्याचे उतारे मिळू शकतील. शिवाय हे सगळे उतारे तुम्हाला ऑनलाईनही काढता येऊ शकतात.

bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा विभाग निवडून मग जिल्हा तालुका आणि गाव निवडून त्यात माहिती टाकलीत, की तुमचा सातबाऱ्याचा उतारा ऑनलाईनही काढता येईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp