नवा लेटरबॉम्ब: ‘विशेष अधिवेशन बोलवा,’ राज्यपालांचा ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई तक

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. मुंबईतील साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी, काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. ज्याविषयी एक पत्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

मुंबईतील साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी, काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. ज्याविषयी एक पत्र राज्यापालांना देण्यात आलं होतं. याच पत्रात महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. हेच पत्र राज्यापालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. ज्यावर टिप्पणी करताना त्यांनी महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो. असं म्हटलं आहे.

पाहा राज्यापालांनी ठाकरे सकारला नेमका काय सल्ला दिलाय

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो (you may consider calling a special session to discuss this)अशी टिप्पणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फॉरवर्ड केलेल्या पत्रावर केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp