आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांच्या भानगडी काढण्याचा प्रयत्न केलाय?: मुख्यमंत्री

मुंबई तक

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे खूपच संतापले असल्याचं दिसून आलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी यावरुन भाजपला खडे बोल सुनावले आहेत. सत्ता हवी आहे यासाठीच कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे असे आरोपच यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केले आहेत. ‘कुटुंबाची का बदनामी करताय. आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांची बदनामी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे खूपच संतापले असल्याचं दिसून आलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी यावरुन भाजपला खडे बोल सुनावले आहेत. सत्ता हवी आहे यासाठीच कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे असे आरोपच यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केले आहेत.

‘कुटुंबाची का बदनामी करताय. आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांची बदनामी केलीय? कधी तुमच्या कुटुंबीयांच्या काही भानगडी असतील आहे असं म्हणत नाही… पण तसं काही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे? मी येतो तुमच्या बरोबर.. मला टाका तुरुंगात.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपला संताप सभागृहातच व्यक्त केला.

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले:

‘तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करुन.. म्हणजे महाभारतात शिखंडीचा उल्लेख आहे. तो शिखंडी कोण होता हे मी सांगण्याची गरज नाही. लढण्याची ताकद नाही मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण आहे. कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत. नामर्दपणा म्हणतात.’

हे वाचलं का?

    follow whatsapp