सातपुडाच्या रांगात, तापीच्या खोऱ्यात, गांजा शेती जोरात
उत्तर महाराष्ट्रातला धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा…निसर्गाचे वैभव लाभलेला हा जिल्हा सातपुडाच्या पर्वतरांगानी आणि तापीच्या सानिध्याने समृध्द बनला आहे. सातपुडयाच्या पर्वत रांगामुळे आणि जंगलामुळे धुळ्यातला शिरपुर आणि साक्री तालुका हा भाग दुर्गम मानला जातो. इथे बहुसंख्य भागात आदिवासी जमातींचे प्राबल्य आहे. हा भाग छोट्या छोट्या टेकड्यांनी बनलेला आहे आणि येथे पोचणे […]
ADVERTISEMENT

उत्तर महाराष्ट्रातला धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा…निसर्गाचे वैभव लाभलेला हा जिल्हा सातपुडाच्या पर्वतरांगानी आणि तापीच्या सानिध्याने समृध्द बनला आहे. सातपुडयाच्या पर्वत रांगामुळे आणि जंगलामुळे धुळ्यातला शिरपुर आणि साक्री तालुका हा भाग दुर्गम मानला जातो. इथे बहुसंख्य भागात आदिवासी जमातींचे प्राबल्य आहे. हा भाग छोट्या छोट्या टेकड्यांनी बनलेला आहे आणि येथे पोचणे अवघड आहे आणि याच सर्व कारणांमुळे हा भाग महाराष्ट्रातल्या गांजा शेतीचे प्रमुख केंद्र बनला होता
भारतात गांजाचे सेवन करणे हा बऱ्याच ठिकाणी लोकपरंपरेचा भाग असला आणि ग्रामीण भागात गांजाचे सेवन सर्रास केले जात असले तरी गांजाचे सेवन करणे,लागवड करणे आणि त्याचा व्यापार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण गांजाला असलेली मोठी मागणी आणि चढ्या भावाने मिळणारी किंमत यामुळे धुळ्यातल्या दुर्गम भागातले आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीकडे ओढले जातायेत.
गांजाच्या शेतीला पूरक प्रदेश ?