Maharashtra Bandh: शरद पवारांच्या आग्रहामुळे शिवसेनेची फरफट, आजचा बंद फसला – चंद्रकांत पाटील
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील हत्याकांडाविरुद्ध राज्यात आज महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी एक दिवसाच्या बंदची घोषणा केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन दुकानदारांना आपली दुकानं बंद करायला भाग पाडलं. काही ठिकाणी तणावाचे प्रसंगही निर्माण झाले. परंतू विरोधी पक्षातील भाजपने या बंदवरुन शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोले लगावले आहेत. आजचा […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील हत्याकांडाविरुद्ध राज्यात आज महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी एक दिवसाच्या बंदची घोषणा केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन दुकानदारांना आपली दुकानं बंद करायला भाग पाडलं. काही ठिकाणी तणावाचे प्रसंगही निर्माण झाले. परंतू विरोधी पक्षातील भाजपने या बंदवरुन शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोले लगावले आहेत.
आजचा बंद हा पूर्णपणे फसला असून शिवसेनेची या बंदमध्ये सहभागी व्हायची इच्छा नव्हती परंतू पवारांच्या आग्रहामुळे त्यांची फरफट झाली असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Maharashtra Bandh: ‘जालियनवाला बाग तर पुण्यातील मावळमध्ये झालेलं’, फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
शरद पवारांमुळे शिवसेनेची फरफट –