मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत होती. अखेर याच प्रकरणी संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद गमावावं लागून असून आज (28 फेब्रुवारी) त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. राज्यपालांनी राजीनाम्यावर अधिकृत मोहोर उमटवल्यानंतर राठोड यांचा राजीनामा ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढील भूमिकेकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, काल (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची वर्षा निवासस्थानावर बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब यांच्यासह महत्वाचे शिवसेना नेते हजर होते. या बैठकीत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाईल असा अंदाज बांधला जात होता. परंतू तिथे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढवला जात होता. शनिवारी भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन राठोड यांच्याविरोधात निदर्शनंही केली होती. अशा परिस्थितीत अधिवेशनात विरोधी पक्षाला वरचढ होऊ न देण्यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला गेला आहे.

ही बातमी पाहा: संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-चित्रा वाघ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘या’ प्रकरणामुळे संजय राठोडांना गमवावं लागलं मंत्रिपद –

७ फेब्रुवारीला पुण्यात 21 वर्षीय पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. या प्रकरणात पूजा चव्हाणच्या काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप व्हायरल एक आवाज हा संजय राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर जेव्हा भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत असतान देखील संजय राठोड हे समोर आले नव्हेत. तब्बल 15 दिवसानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी आपली बाजू मांडली होती.

ADVERTISEMENT

पोहरादेवी मधलं शक्तीप्रदर्शनही राठोडांना भोवल्याची चर्चा –

ADVERTISEMENT

बंजारा समाजाचं देवस्थान असलेल्या पोहरादेवी संस्थान येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड हे सर्वांसमोर आले होते. यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थक पोहरादेवी संस्थानाच्या परिसरात हजर होते. मात्र, याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना राज्यात कोरोनाच्या केसेस वाढत असून घराबाहेर पडताना लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं भान पाळावं असं आवाहन केलं होतं. तसेच राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करुन हजारोंचा जमाव गोळा करत राज्य सरकार तोंडघशी पडलं होतं. त्यामुळे राठोडांबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये अधिक नाराजीचं वातावरण निर्माण झालं.

अवश्य वाचा: संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत

दुसरीकडे भाजप याप्रकरणी अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. तसेच त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकारवर तुफान टीका केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT