एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘नंदनवन’वर सव्वा तास खलबतं; मंत्रिमंडळ विस्तार कधी?

मुंबई तक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वनियोजित नांदेड-हिंगोली दौरा बाजूला ठेवत सव्वा तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे सध्या राहत असलेल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या असून, उद्यापर्यंत विस्तार होण्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (८ ऑगस्ट) नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर जाणार होते. सकाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वनियोजित नांदेड-हिंगोली दौरा बाजूला ठेवत सव्वा तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे सध्या राहत असलेल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या असून, उद्यापर्यंत विस्तार होण्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (८ ऑगस्ट) नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर जाणार होते. सकाळी ११ वाजेपर्यंत एकनाथ शिंदे हे नांदेडमध्ये पोहोचणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिरापर्यंत नंदनवन बंगल्यावरून बाहेरच पडले नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस हे नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या दिशेनं सरकारने हालचालींना सुरू केल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरून नंदनवन या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ९० मिनिटं बैठक चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि पावसाळी अधिवेशनाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून, शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही बाजूंचे प्रत्येकी सात आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समजते. मंत्रिमंडळ विस्तारात सुरूवातील वरिष्ठ नेत्यांचा समावेश असणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात विधानसभेतील आमदारांनाच स्थान देण्यात यावं, अशी मागणी आमदारांकडून होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp