MLC Election : विधानसभेवेळी डावललेल्या बावनकुळेंबद्दल भाजपाची भूमिका का बदलली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची शुक्रवारी रात्री घोषणा केली. यात नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री आणि पक्षाचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, विधानसभेच्या वेळी बावनकुळे यांची इच्छा असतानाही भाजपाने तिकीट दिलं नाही. मात्र, विधान परिषद निवडणुकीत भाजपाने बावनकुळे यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे पक्षाची अचानक भूमिका का बदलली, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा बावनकुळे यांची होती. त्यावेळी त्यांनी पत्नीला उमेदवारी देण्याबद्दलही भूमिका घेतली होती. मात्र, भाजपने भूमिका बदलली नाही. आता उमेदवारी देण्यात आल्याने प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. राजकीय समीकरणं बदललण्याने आणि त्याचा परिणाम विविध निवडणुकांत दिसून आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा ओबीसी चेहरा समोर केल्याचं बोललं जात आहेत. बावनकुळे यांना उमेदवारी देण्यामागे काही राजकीय समीकरणं असल्याचं दिसत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

MLC Election : विधानसभेला डावललेल्या बावनकुळेंना तिकीट; भाजपाचे 5 उमेदवार जाहीर

१) बावनकुळे यांना ते ओबीसी नेते असल्यामुळे आणि गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आंदोलनात त्यांचा असलेला सक्रिय सहभाग बघता उमेदवारी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

२) पुढच्या वर्षी म्हणजेच 2022च्या सुरुवातीलाच नागपूर महापालिका निवडणूक लागणार आहे. ओबीसी उमेदवाराला तिकीट दिलं नसतं, तर चुकीचा मॅसेज जाण्याची शक्यता होती. याचा फटका बसण्याचीही शक्यता होती. पक्षाचं हे नुकसान टाळण्यासाठी बावनकुळे यांना तिकीट दिल गेलं.

ADVERTISEMENT

Maharashtra MLC Election : आदित्य ठाकरेंसाठी ‘वरळी’ सोडणाऱ्या शिंदेना शिवसेनेकडून ‘गिफ्ट’; रामदास कदमांचा पत्ता कट

३) 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचं ऐनवेळी तिकीट कापल्यामुळे भाजपला निवडणुकीत मोठं नुकसान सहन कराव लागलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नागपूर जिल्ह्यात सहा पैकी पाच ठिकाणी भाजपचे आमदार होते. ती संख्या आता दोन वर आली आहे. ओबीसी उमेदवाराला डावलल्यामुळेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.

४) 2019 विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचं तिकीट कापल्यानंतर सुद्धा ते पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत गेले. त्यांनी ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यभर दौरे केले. काही दिवसांपूर्वी त्यांना भाजपने प्रदेश महासचिवपदाची जबाबदारीही दिली. त्याच वेळी बावनकुळे यांचं राजकीय पुनर्वसन पक्षातर्फे करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

५) अखेर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेत उमेदवारी देऊन एकप्रकारे बावनकुळे यांचं तब्बल दोन वर्षानंतर का होईना पण राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता पक्षाला कुठेही नुकसान होऊ नये, यासाठी भाजपने बावनकुळे यांना उमेदवारी देऊन आम्ही ओबीसी समाजसोबतच आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.

६) नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकूण 556 मतदार आहेत. त्यापैकी जवळपास 325 मतदार भाजपकडे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ज्याला भाजपकडून तिकीट मिळेल त्याचा विजय निश्चित असं समीकरण आधीच ठरलेलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT