नियतीचा क्रूर खेळ! अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, दुधाच्या टँकरने चिरडले

मुंबई तक

Accident News : एका अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तीन मित्रांचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला इतकी भीषण धडक दिली की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातानंतर टँकरने या तिघांनाही सुमारे 100 मीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले.

ADVERTISEMENT

Accident News
Accident News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नियतीचा क्रूर खेळ!

point

अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

point

दुधाच्या टँकरने चिरडले

Accident News : नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आला आहे. एका अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तीन मित्रांचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला इतकी भीषण धडक दिली की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातानंतर टँकरने या तिघांनाही सुमारे 100 मीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले. या भीषण घटनेत 35 वर्षीय बलवान, 32 वर्षीय अजय कुमार आणि 29 वर्षीय सुरज या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ज्या घरातून हे तरुण हसत-खेळत बाहेर पडले होते त्याच घरावर आता शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा : मुलाने 13व्या मजल्यावरून मारली उडी, फ्लॅटमध्ये आईचा कुजलेला मृतदेह.. दुहेरी मृत्यूने सोसायटीत घबराट

मैत्रीचा शेवट 

हे तिघेही जिवलग मित्र होते. 60 वर्षीय प्रेमादेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी ते यमुना घाटाकडे निघाले होते. मात्र त्यांना तिथेपर्यंत पोहोचताच आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टँकरचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकीला धडक बसताच तिघे तरुण टँकरच्या चाकांखाली आले. माणुसकीला काळिमा फासणारी बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतरही चालकाने गाडी थांबवली नाही, उलट तो त्यांना चिरडत पुढे निघून गेला. तिघांच्याही शरीराची झालेली अवस्था पाहून उपस्थित हादरुन गेले.

ट्राफिक जाममुळे 10 किलोमीटरपर्यंत रांगा

या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मृत तरुणांच्या नातेवाईकांसह स्थानिकांनी रस्त्यावर धाव घेतली. आपल्या पोटच्या गोळ्यांचा असा अंत झालेला पाहून पालकांनी हंबरडा फोडला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरला. जेव्हा पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भावनांचा उद्रेक झालेली माणसे क्रेनसमोर आडवी झोपली. यामुळे तब्बल तीन तास 10 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 'आमची मुले परत आणून द्या' या आर्त हाकेने संपूर्ण परिसर हेलावून गेला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp