हुश्श! महाराष्ट्राला मोठा दिलासा! दिवसभरात आढळले २८,२८६ रुग्ण, ३६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरू असतानाच राजधानी मुंबईपाठोपाठ आज राज्यालाही मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात प्रथमच रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात २८,२८६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ३६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात आज दिवसभरात २१,९४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरू असतानाच राजधानी मुंबईपाठोपाठ आज राज्यालाही मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात प्रथमच रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात २८,२८६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ३६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात आज दिवसभरात २१,९४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ७०,८९,९३६ इतकी झाली आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.०९ टक्के इतका असून, दिवसभरात राज्यात २८,२८६ नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं.

देशात ‘ओमिक्रॉन’च्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात; मुंबईसह महानगरांमध्ये ठरतोय वरचढ

कोरोना बाधित ३६ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३५,११,८६१ नमुन्यांपैकी ७५,३५,५११ म्हणजेच १०.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात १४,३५,१४१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून, ३,४०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp