घात झाला! अतिरेक्यांच्या हल्ल्यात 5 जवान शहीद, कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी, मुलाचाही मृत्यू

मुंबई तक

आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकाऱ्याला लक्ष्य करत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 5 जवान शहीद झाले आहेत. तसंच या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. (Commanding Officer of an Assam Rifles unit and his family were killed in a militant attack) हा स्फोट इतका भयंकर होता की, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकाऱ्याला लक्ष्य करत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 5 जवान शहीद झाले आहेत. तसंच या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. (Commanding Officer of an Assam Rifles unit and his family were killed in a militant attack)

हा स्फोट इतका भयंकर होता की, कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना बेहिआंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं.

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आसाम रायफल्सच्या ताफ्यावर शनिवारी (13 नोव्हेंबर 2021) सकाळी 11 वाजता मणिपूरमधील थिंगाट येथे बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्स 46 चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह 5 जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले.

कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी यांच्या पत्नी आणि मुलगा यांनाही या घटनेत आपला जीव गमवावा लागला. आसाम रायफल्सचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत, असं या निवेदनात म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp