पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचे केवळ 2 नगराध्यक्ष निवडून येणार, तर ठाकरेंचा 1; नगरपरिषद निवडणुकीचा Exit Poll
Nagar Parishad and Nagar Panchayat Election Exit Poll : साखर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. भाजप 27 नगरपरिषदांवर आघाडीवर राहील, असा अंदाज आहे. अजित पवार गटाला 12, तर शिंदे गटाला 7 नगरपरिषदांमध्ये यश मिळू शकते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचे केवळ 2 नगराध्यक्ष निवडून येणार
तर ठाकरेंचा 1; नगरपरिषद निवडणुकीचा Exit Poll
Nagar Parishad and Nagar Panchayat Election Exit Poll : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, JDS या संस्थेच्या एक्झिट पोलमधून राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाचे केवळ दोन नगराध्यक्ष निवडून येणार असल्याचा अंदाज असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वाट्याला अवघा एक नगराध्यक्ष येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याउलट भाजप आणि महायुतीचे पारडे राज्यभर जड दिसत आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असले तरी त्याआधीच एक्झिट पोलने संभाव्य राजकीय समीकरणे मांडली आहेत. या अंदाजानुसार, भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वाधिक नगरपरिषदांवर विजय मिळवणारा पक्ष ठरू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 2 जागा मिळणार
साखर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. भाजप 27 नगरपरिषदांवर आघाडीवर राहील, असा अंदाज आहे. अजित पवार गटाला 12, तर शिंदे गटाला 7 नगरपरिषदांमध्ये यश मिळू शकते. विशेष म्हणजे, शरद पवार गट फक्त 2 नगराध्यक्षांपुरताच मर्यादित राहील, तर शिवसेना (UBT) गटाला केवळ 1 नगराध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. या भागात 21 नगरपरिषदांवर स्थानिक आघाड्या किंगमेकर ठरू शकतात.
राज्यातील चित्र कसं असेल?
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, भाजप 140 ते 152 नगरपरिषदांवर विजय मिळवू शकतो. शिंदे गट 34 ते 42, अजित पवार गट 24 ते 36, तर काँग्रेस 24 ते 35 नगरपरिषदांमध्ये यश मिळवू शकते. शिवसेना (UBT) आणि शरद पवार गटासाठी मात्र ही निवडणूक अपेक्षाभंग करणारी ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमधून स्पष्ट होत असलेले चित्र पाहता, महायुतीचे वर्चस्व, स्थानिक आघाड्यांची ताकद आणि विरोधकांची मर्यादित कामगिरी हे या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य ठरण्याची चिन्हे आहेत.










