राज ठाकरेंच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत! संमती मिळाल्यावर काय म्हणाले बाळा नांदगावकर?

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला औरंगबाद पोलिसांनी सशर्त संमती दिली आहे. यानंतर मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे अशी ओळख असलेले बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत गर्दी होतेच असं त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे सिक्युरिटी वाद कधीपासून आहे सुरू, किती वेळा बदलली सुरक्षा? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला औरंगबाद पोलिसांनी सशर्त संमती दिली आहे. यानंतर मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे अशी ओळख असलेले बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत गर्दी होतेच असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे सिक्युरिटी वाद कधीपासून आहे सुरू, किती वेळा बदलली सुरक्षा?

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

पोलिसांनी संमती दिली आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांनी ज्या अटी घातल्या आहेत तो त्यांचा फॉरमॅट आहे. आवाजाच्या मर्यादेचीही अट त्यांनी घातली आहे. त्याचंही आम्ही पालन करू पण लोक म्हटले तर त्यावेळी आम्ही काय करायचं पाहू. आम्हाला दोन दिवस आधी संमती मिळाली आहे. त्यामुळे मला वाटत नाही काही अडचणी येतील. राज ठाकरेंना यासंदर्भात कळवलं आहे असंही बाळा नांदगावकरांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp