आर्यन खानचं अपहरण करून 25 कोटींच्या खंडणीचा मोहीत कंबोजचा खेळ एका सेल्फीने बिघडवला-नवाब मलिक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खानचं अपहरण करून खंडणी वसुलीचा मोहीत कंबोजने कट रचला होता. समीर वानखेडे आणि मोहीत कंबोज यांचे चांगले संबंध आहेत. आर्यन खानला अडकवायचं, त्या बदल्यात 25 कोटी रूपये मागायचे. त्यानंतर 18 कोटीमध्ये डील पक्की झाली. मोहीत कंबोजने हा सगळा खेळ रचला होता असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. ड्रग्जचा व्यवसाय जोरात चालू ठेवायचा हाच समीर वानखेडेंचा उद्योग आहे. त्याद्वारे फिल्म जगतातील लोकांना ट्रॅप मध्ये अडकवायचं आणि कोट्यवधी वसूल करायचे हा समीर वानखेडेंचा खेळ आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

आर्यन खानला प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावलं होतं. त्याने क्रुझचं तिकिट काढलं नव्हतं. आर्यनचं अपहरण करून 25 कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. एका सेल्फीने सगळा खेल बिघडवला हे वास्तव आहे. आर्यन खानच्या अपहरणाचा कट मोहित कंबोजने रचला होता. समीर वानखेडे आणि मोहीत कंबोज यांचे चांगले संबंध आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

एक महिन्यापूर्वी म्हणजेच 6 ऑक्टोबरला मी काही खुलासे केले होते ते तुम्हाला माहित आहे. 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर एनसीबीने छापा मारला आणि बातमी आली की एका मोठ्या स्टारच्या मुलाला ताब्यात घेतलं गेलं आहे. 3 ऑक्टोबरला आर्यन खानसह आठजणांना अटक केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर मी 6 तारखेला व्हीडिओचे पुरावे दाखवत हे सगळं प्रकरण म्हणजे बनाव आहे हे समोर आणलं होतं असंही नवाब मलिक यांनी आज सांगितलं. के. पी. गोसावी आणि मनिष भानुशाली या दोघांचा व्हीडिओ मी त्यावेळी दाखवले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हाय प्रोफाईल आरोपींना हे दोघे खेचत एनसीबी कार्यालयात का घेऊन जात आहेत असा प्रश्न मी विचारला होता. त्यावेळी ज्ञानेश्वर सिंग म्हणून एनसीबीचे अधिकारी समोर आले त्यांनी हे सांगितलं की आमचे ९ स्वतंत्र साक्षीदार या प्रकरणात आहेत. माझ्यावर तेव्हा आरोप कऱण्यात आले की मी पूर्वग्रह दुषित दृष्टीकोनातून आरोप केले आहेत. मात्र त्यावेळी मी जावयाबद्दल जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हाच मी बोललो होतो. 13 जानेवारीला माझ्या जावयाला अटक केली होती. त्यानंतर 14 ताऱखेला मी ट्विट केलं होतं की देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे.

ADVERTISEMENT

9 ऑक्टोबरला मी तुम्हाला एक व्हीडिओ दाखवला त्यात झोनल डायरेक्टर हे सांगत होते की आम्ही ८ ते १० लोकांना ताब्यात घेतलं आहे असं म्हणत होते. त्यावेळी मी विचारलं होतं की एवढा मोठा अधिकारी नक्की किती लोक होते हे का सांगू शकत नाही? त्यानंतर मी आणखी एक व्हीडिओ पोस्ट केला ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आमीर फर्निचरवाला या तिघांचा तो व्हीडिओ होता. त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ऋषभचे वडील, काका हे एनसीबी कार्यालयात आले आणि या तिघांना घेऊन जात असतानाचा व्हीडिओही आम्ही दाखवला. त्यानंतर समीर वानखेडेंनी सांगितलं की आम्ही 14 लोकांना ताब्यात घेतलं होतं.

ADVERTISEMENT

मात्र समीर वानखेडेंनी लोकांना दिशाभूल करणं सुरू केलं. या तीन लोकांना सोडून देण्यातच सगळी मेख आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मोहित कंबोजने 1100 कोटी रूपयांच्या घोटाळ्यातला आरोपी आहे असाही आरोप मलिक यांनी केला. आधी मोहीत कंबोज काँग्रेसच्या लोकांमागे फिरत होता. सरकार बदलल्यानंतर तो भाजपमध्ये गेला. विधानसबा निवडणूक त्याने लढवली. मात्र तो जिंकला नाही, त्यानंतर भाजयुमोचं अध्यक्ष कऱण्यात आलं. त्याने जो घोटाळा केला त्याप्रकरणी सीबीआयने छापा मारला. ६० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी हा छापा मारण्यात आला. मात्र नंतर हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं. गेल्या महिन्याभरापासून हा माणूस हादरून गेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT