NCB ने माझ्या जावयाला ‘असं’ अडकवलं, नवाब मलिकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

मुंबई तक

मुंबई: ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) बनावट कारवाया करंत या माझ्या मतावर मी आजही कायम आहे.’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या जावयाला कशाप्रकारे अडकवलं गेलं याचा घटनाक्रमच त्यांनी सांगितलं आहे. ‘सुरुवातीला असं सांगण्यात आलं की, माझ्या जावयाकडे 200 किलो गांजा सापडला पण तो गांजा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) बनावट कारवाया करंत या माझ्या मतावर मी आजही कायम आहे.’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या जावयाला कशाप्रकारे अडकवलं गेलं याचा घटनाक्रमच त्यांनी सांगितलं आहे.

‘सुरुवातीला असं सांगण्यात आलं की, माझ्या जावयाकडे 200 किलो गांजा सापडला पण तो गांजा नव्हता तर ते हर्बल टोबॅको (तंबाखू) होतं. असं कोर्टाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.’ असं म्हणत नवाब मलिक यांनी या प्रकरणात NCB वर अनेक आरोप केले आहेत.

या प्रकरणात फक्त साडेसात ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे तो त्यांना फर्निचरवालाकडे सापडला होता. बाकी संपूर्ण गोष्टी या हर्बल टोबॅको आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. प्रश्न हा आहे की, एवढी मोठी एजन्सी NCB यांना तंबाखू आणि गांजा यातील फरक समजत नाही याबाबत खरंच आश्चर्य वाटतं. माझ्या माहितीनुसार, याप्रकरच्या केसेसमध्ये ज्या एजन्सी काम करतात त्यांच्याकडे इन्सटंट टेस्टिंग किट असतं. त्यामुळे त्यांना समजतं की, आपण जप्त केलेले पदार्थ हे अंमली पदार्थ आहेत की नाही.

नवाब मलिकांनी जावयाच्या अटकेप्रकरणी सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम

हे वाचलं का?

    follow whatsapp