समीर वानखेडेंच्या बदलीनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. त्यांना याआधी देण्यात आलेली मुदतवाढ ही 31 डिसेंबर रोजी संपली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून ते मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर आर्यन खानच्या अटकेपासून ते सतत चर्चेत राहिले होते. पण याच प्रकरणात त्यांच्यावर प्रचंड […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. त्यांना याआधी देण्यात आलेली मुदतवाढ ही 31 डिसेंबर रोजी संपली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून ते मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर आर्यन खानच्या अटकेपासून ते सतत चर्चेत राहिले होते. पण याच प्रकरणात त्यांच्यावर प्रचंड टीका देखील करण्यात आली होती.
‘भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व कमी झालं आहे’ नवाब मलिक यांचं वक्तव्य
याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांनी जेव्हा ऑक्टोबर महिन्यात कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला आणि आर्यन खानला अटक केली तेव्हापासून नवाब मलिक यांनी त्यांच्यावर विविध आरोप केले. आता त्यांनी समीर वानखेडे यांच्या बदलीनंतरही प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर दुबईतून ‘फोटोबॉम्ब’