आयएनस विक्रांतमध्ये एक दमडीचा गैरव्यवहार नाही, उद्धव ठाकरेंचं सरकार उद्धट-सोमय्या

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या आज प्रसारमाध्यमांसमोर हजर झाले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मी बॉम्बे हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो. मला त्यांनी मला नुसता दिलासा दिला नाही तर जो प्रश्न मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो आहे. मुंबई पोलिसांना माफियासारखं सरकार वागवत आहे. धाक दाखवायचा, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या आज प्रसारमाध्यमांसमोर हजर झाले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

मी बॉम्बे हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो. मला त्यांनी मला नुसता दिलासा दिला नाही तर जो प्रश्न मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो आहे. मुंबई पोलिसांना माफियासारखं सरकार वागवत आहे. धाक दाखवायचा, खोटे आरोप करायचे हेच नाटक सुरू आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.

भर पत्रकार परिषदेत जोडा काढत किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत तुम्ही खुशाल….

उद्धव ठाकरे यांनी एक लक्षात ठेवावं की त्यांचे डर्टी डझन मंत्र्यांच्या विरोधात मी बोलणारच. त्यांना शिक्षा होईपर्यंत मी गप्प बसणार नाही असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. आम्हाला खात्री होती की मुंबई पोलिसांना विचारलं जाईल की FIR कोणत्या आधारावर घेतली गेली? नेमकं तेच घडलं. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. यशवंत जाधव, हसन मुश्रीफ आणि अनिल परब या तिघांसाठीचा होमवर्क मी केला आहे. त्यासाठीच नॉट रिचेबल होतो असंही किरीट सोमय्यांनी हसत हसत सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp