काँग्रेस म्हणजे काय मुघल सल्तनत आहे का? पृथ्वीराज चव्हाणांचा उद्विग्न सवाल
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस पक्षातील राजीनाम्यानंतर काँग्रेसमधूनच दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी आझाद यांच्यावर टीका करताना ज्यांना काँग्रेस पक्षाने सगळे दिले ज्यांना गांधी परिवाराने सगळे दिले तेच आता तक्रार करत आहेत, पक्ष सोडून चालले आहेत. हे काही बरोबर नाही. असे म्हंटले आहे. […]
ADVERTISEMENT

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस पक्षातील राजीनाम्यानंतर काँग्रेसमधूनच दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी आझाद यांच्यावर टीका करताना ज्यांना काँग्रेस पक्षाने सगळे दिले ज्यांना गांधी परिवाराने सगळे दिले तेच आता तक्रार करत आहेत, पक्ष सोडून चालले आहेत. हे काही बरोबर नाही. असे म्हंटले आहे. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र गांधी कुटुंबियांनी दिले याचा अर्थ काँग्रेस म्हणजे काय मुघल सल्तनत आहे का? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे.
‘मुंबई तक’ ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही मानसिकता महत्वाची आहे, आणि त्याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. गांधी कुटुंबियांनी दिले म्हणजे ही काय वैयक्तिक मालकीची गोष्ट आहे का? हा एक लोकशाही मार्गाने चालणारा राजकीय पक्ष आहे. त्याची घटना आहे, पक्षाची नोंदणी करताना निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी केली आहे. आता हा पक्ष त्या घटनेप्रमाणे चालणार आहे का? त्या घटनेमधील तरतुदींप्रमाणे चालणार आहे का? की गांधी कुटुंबियांनी दिले आणि आता तुम्ही समाधान मानले पाहिजे, असे काही आहे का? दिले म्हणजे काय? मुघल बादशाहीतील ही मुघल सल्तनत आहे का?
काँग्रेसच्या सात आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला क्रॉस व्होटिंग केलं, पृथ्वीबाबांचा गौप्यस्फोट
लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत. सगळ्या नेमणुका होत आहेत, त्यामुळे तुम्ही असं म्हणतं आहात. तुमची नेमणूक केली म्हणजे तुम्ही खूश झाले पाहिजे. अरे नेमणुका का करता? तुम्ही निवडणुका का घेत नाहीत? गेल्या 24 वर्षांमध्ये पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत, याचा कुठेतरी आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? असा सवालही त्यांनी विचारला.