महत्त्वाची बातमी! पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासंदर्भात ठाकरे सरकारने घेतला निर्णय

मुंबई तक

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याबरोबरच पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. पदोन्नती आरक्षणासंदर्भातील विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ठ असून, शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याबरोबरच पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे.

पदोन्नती आरक्षणासंदर्भातील विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ठ असून, शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले आहेत.

१) राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 (4) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही असे राज्याचे मत असल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अपुरे प्रतिनिधित्व व प्रशासकीय कार्यक्षमता या दोन निकषांची पूर्तता होत असल्यामुळे राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp