Sanjay Raut : ‘…तेव्हा लोक त्यांच्याकडे अपेक्षेनं बघतील’; राष्ट्रपती होताच द्रौपदी मुर्मूंना आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी त्यांना संविधानाचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, प्रफुल्ल पटेलांची जप्त करण्यात आलेली संपत्ती आणि आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेबद्दलही भाष्य केलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल राऊत म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याचा सर्वांनाच आनंद आहे. कारण तळागाळातून आलेली एक महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांच्या विजयात आमचा खारीचा वाटा आहे.”

राष्ट्रपती निवडणुकीबद्दलचा शिंदेंचा दावा फोल; द्रौपदी मुर्मूंना महाराष्ट्रातून किती मतं मिळाली?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच मुद्द्यावर राऊत म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या देशाच्या संविधानाच्या रखवालदार आहेत. देशाच्या घटनात्मक प्रमुख आहे. त्यामुळे या देशात घटनेची पायमल्ली होणार नाही. देशात कायद्याचं राज्य राहिल, याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कारण जेव्हा जेव्हा घटनेवर हल्ले होतील, तेव्हा देशातील नागरिक त्यांच्याकडे अपेक्षेनं बघतील,” असं राऊतांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा आज नाशिक जिल्ह्यात पोहोचणार आहे. यावर राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी ठाण्यापासून त्यांनी शिव संवाद यात्रा सुरु केली. त्यांना ठाण्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता ते पुढे पुढे जात आहेत. आदित्य ठाकरे जिकडे जाताहेत, तिकडे त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील भविष्यातील वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेल. उद्धव ठाकरेही दौऱ्यावर जातील,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

“या देशात केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत, हे सगळ्यांना माहितीये. हे काही लपून राहिलेलं नाही. विरोधी पक्षातील लोक, मग तो कोणत्याही पक्षाचे असोत, ते जेव्हा देशहितासाठी प्रश्न विचारतात तेव्हा त्यांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणा वापरल्या जात आहेत. जो प्रश्न विचारेल, त्याला बोलावलं जाईल. तुरुंगात पाठवलं जाईल. या सगळ्यांसाठी आम्ही तयार आहोत,” असा पुनरुच्चार संजय राऊतांनी केला.

ADVERTISEMENT

द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती; निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे

ADVERTISEMENT

“सोनिया गांधींना बोलावलं. पुन्हा बोलावणार आहेत. प्रफुल्ल पटेलांवर कारवाई झाली. मलाही नोटीस आलीये. त्यामुळे यंत्रणावर दबाव आहे. दबावाखालीच त्या काम करत आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी आम्हाला लढा द्यावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT