Pankaja Munde: ‘राजकारणाची वाट काटेरी, पण..’, असं का म्हणाल्या पंकजा मुंडे?

मुंबई तक

Pankaja Munde on Politics: बीड: ‘राष्ट्रसंत भगवान बाबांनी त्याकाळी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून खऱ्या अर्थाने आरक्षण दिलं. संत मीराबाई यांचे आशीर्वाद व महंत राधाताई महाराज यांची गेल्या पंचवीस वर्षापासूनची कठोर साधना याचा परिपाक म्हणून हे संस्थान महिलांची पंढरी झाली आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात मला अनेक चांगली कामं करता आली, ते माझं कर्तव्यच होतं तथापि जनसामान्याचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Pankaja Munde on Politics: बीड: ‘राष्ट्रसंत भगवान बाबांनी त्याकाळी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून खऱ्या अर्थाने आरक्षण दिलं. संत मीराबाई यांचे आशीर्वाद व महंत राधाताई महाराज यांची गेल्या पंचवीस वर्षापासूनची कठोर साधना याचा परिपाक म्हणून हे संस्थान महिलांची पंढरी झाली आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात मला अनेक चांगली कामं करता आली, ते माझं कर्तव्यच होतं तथापि जनसामान्याचं मिळत असलेलं प्रेम हिच माझी खरी ताकद आहे.’ असे भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज येथे सांगितले. (see what exactly pankaja munde had to say about politics and ministership)

महासांगवी येथे सिद्धसंत मीराबाई आईसाहेब यांच्या २५व्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित स्त्री शक्तीचा जागर महिला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘महंत राधाताई महाराज यांनी अत्यंत कमी वयात या गादीचा वारसा सक्षमपणे पुढे नेला आहे कोणत्याही गादीचा वारसा चालवणे हे सोपे नाही. आज महिला आरक्षणाचा लढा आपण लढतोय पण त्याकाळात संत भगवान बाबांनी खऱ्या अर्थाने महिलांना आरक्षण दिले. कारण ते एक वैभवशाली परंपरेचे संत होते.’

‘आमचं तर रक्ताचं नातं’, पंकजा मुंडेंनी धनंजय मुडेंना काय दिला सल्ला?

हे वाचलं का?

    follow whatsapp