कृषी बिलावरुन तोमर यांना पवारांचे उत्तर…

मुंबई तक

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता नवे वळण घेतले आहे. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर केंद्र सरकारने आक्रमक होत पोलीस कारवाईचा बडगा उगारला आहे. या घटनाक्रमानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधत पवार हे देशातल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप केला आहे. तोमर यांनी ट्विटमध्ये म्हटले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता नवे वळण घेतले आहे. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर केंद्र सरकारने आक्रमक होत पोलीस कारवाईचा बडगा उगारला आहे.

या घटनाक्रमानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधत पवार हे देशातल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप केला आहे.

तोमर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृषी कायद्यांमुळे बाजार समित्या किंवा मंडई व्यवस्था दुबळी होईल, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल केवळ राज्यातच नव्हे; तर राज्याबाहेर विकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. नव्या कायद्यांत आहेत तशाच कृषी सुधारणा करण्याचा शरद पवार यांनी याआधी जोरकस प्रयत्न केला होता, असेही तोमर म्हणाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp