स्वातंत्र्यानंतर आजवर कधीही सीमेवर खिळे ठोकले गेले नाहीत-शरद पवार - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / स्वातंत्र्यानंतर आजवर कधीही सीमेवर खिळे ठोकले गेले नाहीत-शरद पवार
बातम्या

स्वातंत्र्यानंतर आजवर कधीही सीमेवर खिळे ठोकले गेले नाहीत-शरद पवार

शेतकरी आंदोलन करत आहेत तो त्यांचा हक्क आहे. मात्र ज्या प्रकारे आत्ता सीमांवर घडतं आहे ते काही चांगलं नाही. स्वातंत्र्यानंतर कधीही देशाच्या सीमांवर कधीही खिळे ठोकले गेले नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. देशात जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे ही काही चांगली गोष्ट नाही. मोदी सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घेतलं जावं अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न

आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केलं जातं आहे. शेतकरी आंदोलन हे हाताळताना मोदी सरकार असमर्थ ठरलं आहे. जे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांना खलिस्तानी आणि अतिरेकी ठरवलं जातं आहे. हे आंदोलन आणि शेतकरी या दोघांनही बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आज शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं. त्यानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाच्या अन्नदात्याचे प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यायला हवं होतं. हे आंदोलन हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणं, खलिस्तानी म्हणणं योग्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने कुणाशीही चर्चा न करता घाईने तीन कायदे पास करून घेतले. या आंदोलनाचा तिढा सोडवायचा असेल तर आता केंद्राने पुढाकार घ्यायला हवा असाही सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

गेल्या 72 दिवसांपासून जास्त काळ दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + eleven =

Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!