मातोश्रीसाठी प्राण द्यायलाही तयार; अनिता बिर्जे एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल काय म्हणाल्या?
शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला. केदार दिघे यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी, तर अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली. नियुक्तीनंतर अनित बिर्जे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल भाष्य केलं. तसेच मातोश्रीसाठी प्राण द्यायलाही तयार असू, अशी भूमिका मांडली. ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मागे अनेकजण जात […]
ADVERTISEMENT

शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला. केदार दिघे यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी, तर अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली. नियुक्तीनंतर अनित बिर्जे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल भाष्य केलं. तसेच मातोश्रीसाठी प्राण द्यायलाही तयार असू, अशी भूमिका मांडली.
‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मागे अनेकजण जात आहे. त्यांच्याबरोबर जायला हवं, असं तुम्हाला का वाटलं नाही?’, या प्रश्नाला उत्तर देताना अनिता बिर्जे म्हणाल्या, “बघायला गेलं, तर मी त्यांच्याही आधीपासून शिवसैनिक आहे. त्याच्यानंतर त्यांचा प्रवेश झाला. लहान भाऊ म्हणून मला त्यांचं कौतुक आहे. पण शिवसेनेनं आम्हाला काय दिलं, यापेक्षा आम्ही शिवसेनेला काय दिलं हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राला तारणारी शिवसेना आहे.”
“संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता. महाराष्ट्रावर अन्याय होत असतानाच्या काळात शिवसेनेचा जन्म झाला. तेव्हापासून ८० समाजकारण आणि २० टक्के राजकारण, असं धोरण हाती घेतलं गेलं. समाजकारण करता यावं म्हणून राजकारण असं शिवसेनेचं धोरण आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“आनंद दिघे आम्हाला सांगायचे की, कधीही तुमच्याकडे मदतीला आले तर तुमचा दरवाजा उघडा असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी मातोश्री वेगळी होती. तिथे माँ असायच्या. त्या आम्हाला नेहमी सांगायच्या की तुम्ही कार्यात उतरला आहात, पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही शिवसेनेचं काम करता आहात? शिवसेना जळता निखारा आहे. या निखाऱ्याशी तुम्हाला खेळायचं आहे. पदरात खेळवायचा आहे, पण पदर जळला नाही पाहिजे आणि निखारा विझला नाही पाहिजे”, असं म्हणत अनिता बिर्जे यांनी मीनाताई ठाकरे यांच्याबद्दलचा अनुभव सांगितला.