किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा, शिवसेना मंत्री अनिल परबांकडून हायकोर्टात याचिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाविकास आघाडीमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. नाहक बदनामी केल्याप्रकरणी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

पाहा अनिल परब यांनी याबाबत नेमकं म्हटलंय

‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांनी माफी न मागितल्याने अनिल परबांनी पाठवली नोटीस

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी 72 तासांमध्ये माफी मागावी नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी 14 सप्टेंबर 2021 रोजी दिला होता. मात्र, या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी माफी न मागितल्याने आता अनिल परब यांनी त्यांच्याविरोधात दावा ठोकला आहे.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांचं पुराव्यांसह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकू अशी नोटीस परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना पाठवली होती.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर नेमके कोणते आरोप केले होते?

अनिल परब यांनी मंत्री असूनही बेकायदेशीर रिसॉर्ट त्यांनी बांधलं त्याचा मालमत्ता करही भरला नाही. मंत्री महोदय हे स्वतः बेकायदेशीर बांधकाम करतात आणि त्यांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री करत आहेत.

अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. असं असूनही असा माणूस मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो? अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. एवढंच नाही तर अनिल देशमुख आणि अनिल परब या दोघांनाही तुरुंगात जावंच लागणार असंही किरीट सोमय्या म्हणाले होते.

अनिल परब यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीसही बजावली होती. एका सीएने अधिकृतरित्या महाराष्ट्र सरकाला अहवाल दिला, की हे रिसॉर्ट बांधण्यात 5 कोटी 42 लाख 44 हजार 200 रुपये खर्च झाले आहेत. अनिल परब यांनी एक दमडीचा खर्च देखील स्वतःच्या खात्यात दाखवलेला नाही. मग रिसॉर्ट बांधण्याचा पैसा कुठून आला?

सचिन वाझेचा वसुलीमधला पैसा होता? किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अनिल परब यांनी स्वतःच्या मित्राला, सदानंद कदमच्या नावाने हा रिसॉर्ट १ कोटी रुपयात करून टाकला. बांधकामाचा खर्च 5 कोटी 42 लाख बाजारभाव ग्रामपंचायतीनुसार 21 कोटी आणि 1 कोटीत अॅग्रीकल्चर लेन म्हणून विकला, असाही आरोप सोमय्यांनी कागदपत्रं दाखवून केला होता.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केले होते. एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा रि-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

नाशिक पोलीस, लोकयुक्तांकडं अनिल परब यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. तसंच सीबीआय, एसीबी, ईडी, एनआयए, अँटी करप्शन देखील या घोटाळ्यांची चौकशी करत आहेत. तसंच राज्यपालांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे दोन महिन्यांचे पाहुणे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

Kirit Somaiya यांनी 72 तासांमध्ये माफी मागितली नाही तर… अनिल परब यांनी दिला इशारा

किरीट सोमय्यांनी हे जे आरोप केले होते त्याच आरोपाबाबात त्यांनी माफी मागावी अशी मागणी अनिल परब यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी 72 तासांची मुदत देखील दिली होती. पण 72 तासांची मुदत उलटून गेली तरीही सोमय्यांनी माफी न मागितल्याने आता अनिल परब यांनी या प्रकरणी कायदेशीर मार्गाचा वापर केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT