प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत १ हजार कोटी घेतले – शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काही दिवसांपूर्वी एमआयएमने महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत दिलेल्या प्रस्तावावरुन राज्यात चांगलंच राजकारण रंगलं होतं. दरम्यान यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. ज्यात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करत त्यांनी निवडणुकीत १ हजार कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं आहे.

हिंगोलीत शिवसंपर्क अभियानादरम्यान, जवळा बाजार येथील आयोजित मेळाव्यात आमदार संतोष बांगर बोलत होते. “एमआयएम ही भाजपची बी टीम असून भाजपने त्यांना मत विभाजीत करण्यासाठी पुढे केलं आहे. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचाही याचसाठी वापर करण्यात आला. आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी, बौद्ध समाजाची मतं मिळवण्यासाठी हा प्रकार घडला. आंबेडकर यांना मागच्यावेळी १ हजार कोटी रुपये देण्यात आले. प्रचारासाठी मागच्या निवडणुकीत आंबेडकरांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. हे हेलिकॉप्टर कुठल्या पैश्यातून आले, हे त्यांनी लोकांना सांगावं”.

दरम्यान संतोष बांगर यांच्या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटायला सुरुवात झाली आहे. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतोष बांगल यांचा पुतळा जाळत त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. दुसरीकडे परभणीतही वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष किती वाढतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT