भयंकर स्फोटाने तीन मजली इमारत जमीनदोस्त; ८ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई तक

भयंकर बॉम्बस्फोटात एक तीन मजली इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ही घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. या इमारतीमध्ये बॉम्ब बनवले जात होते, असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे. भागलपूर जिल्ह्यातील तातारपूर पोलीस ठाणे हद्दीत ही स्फोटाची घटना घडली. या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भयंकर बॉम्बस्फोटात एक तीन मजली इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ही घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. या इमारतीमध्ये बॉम्ब बनवले जात होते, असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे.

भागलपूर जिल्ह्यातील तातारपूर पोलीस ठाणे हद्दीत ही स्फोटाची घटना घडली. या दुर्घटनेत शेजारच्या २ ते ३ घरांचंही नुकसान झालं आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथून पोलीस ठाणे केवळ १०० मीटर अंतरावर आहे. ही घटना बॉम्बस्फोटामुळे घडली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, तीन मजली इमारत पूर्णपणे भुईसपाट झाली.

दुर्घटनेत ८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ८ गंभीर जखमी झाले आहेत. भागलपूरचे पोलीस उप महानिरीक्षक सुजित कुमार यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. प्राथमिक तपासात दारुगोळा, अवैध फटाके आणि गावठी बॉम्ब यामुळे स्फोट झाल्याचं आढळून आलं आहे. एफएसएलचे पथकाच्या तपासानंतरच स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.”

सध्या जखमींवर भागलपूर येथील मायागंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

दोन महिलांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत. भागलपूरच्या माजी उपमहापौर प्रीति शेखऱ म्हणाल्या की, भागलपूरमध्ये सातत्याने बॉम्बस्फोटाच्या घटना घडत आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

हा स्फोट इतका भयंकर होता की, परिसरात सर्वत्र आवाज घुमला. त्याचबरोबर लोकांना सौम्य धक्काही जाणवला. परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुरुवातील सिलेंडर फुटण्यासारखा आवाज आला. यात २ ते ३ इमारतींचं नुकसान झालं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp