‘माणसानं एवढं दुटप्पी वागू नये’, काकांवरच्या टीकेने अजित पवार संतापले.. राज ठाकरेंना सुनावलं!

मुंबई तक

Ajit Pawar: बारामती: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी (2 डिसेंबर) कुडाळमधील पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली होती. राष्ट्रवादीमुळेच शिवाजी महाराजांबाबत (Shivaji Maharaj) राजकारण सुरु झालं असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. ज्याला आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चोख प्रत्युत्तर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ajit Pawar: बारामती: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी (2 डिसेंबर) कुडाळमधील पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली होती. राष्ट्रवादीमुळेच शिवाजी महाराजांबाबत (Shivaji Maharaj) राजकारण सुरु झालं असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. ज्याला आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते बारामतीत बोलत होते. (ajit pawar responded to raj thackerays criticism of sharad pawar ncp vs mns)

‘राज ठाकरेंच्या आरोपात नखभरही तथ्य नाही’

‘राज ठाकरेंचा आरोप हा धादांत खोटा आणि बिनबुडाचा आहे. त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला माहिती आहे की, पवार साहेबांचं नाव घेतलं की ती बातमी होते. पण राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. राज साहेब ज्यावेळेस पवार साहेबांची मुलाखत घेत होते तेव्हा साहेबांच्याबद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी माणसाने वागू नये.’

‘पवार साहेबांना उभा महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय. नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला आणि तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे खरं तर हास्यास्पद बाब आहे. त्यांच्या आरोपात नखभर देखील तथ्य नाही.’ असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp