आई-बाप, भाऊ अन् आजी...मुलाने कुऱ्हाडीने वार करुन सर्वांना संपवलं, नेमकं काय घडलं?
Crime News : मुलाने आपल्याच रक्ताच्या नात्यावर कुऱ्हाडीने घाला घातला. 1 आणि 2 मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या या भीषण हत्याकांडात आरोपीने आई-वडील, बहीण आणि आजीची निर्घृण हत्या केली, तर मोठ्या भावाला गंभीर जखमी केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आई-बाप, भाऊ अन् आजी...मुलाने कुऱ्हाडीने वार करुन सर्वांना संपवलं
नेमकं काय घडलं?
Crime News : माणसाची पैशांची हाव किती टोकाला जाऊ शकते, याचा प्रत्यय आणणारा थरकाप उडवणारा प्रकार उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात समोर आला आहे. जमिनीची विक्री आणि दागिन्यांच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका मुलाने आपल्याच रक्ताच्या नात्यावर कुऱ्हाडीने घाला घातला. 1 आणि 2 मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या या भीषण हत्याकांडात आरोपीने आई-वडील, बहीण आणि आजीची निर्घृण हत्या केली, तर मोठ्या भावाला गंभीर जखमी केले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रूपईडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसंतपुर ऊदल गावात ही घटना घडली. निरंकार नावाच्या तरुणाचे आपल्या कुटुंबीयांशी गेल्या काही दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होते. नुकतीच त्यांच्या कुटुंबाने जमीन आणि काही दागिने विकले होते. या विक्रीतून मिळालेल्या रकमेतील हिस्सा निरंकार मागत होता, मात्र वडील बदलू राम यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. हाच राग मनात धरून रविवारी मध्यरात्री जेव्हा सर्व कुटुंबीय गाढ झोपेत होते, तेव्हा निरंकारने घरात असलेली कुऱ्हाड उचलली आणि एकामागून एक सर्वांवर वार करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना 'फोनाफोनी', नवी ऑफरही देऊन टाकली
मृतांची नावे










