अमित शाह-उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे महाराष्ट्राला झाली बंद दाराआडच्या भेटीची आठवण!

मुंबई तक

महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. दिल्लीला गेल्यानंतर या दोघांनी एकत्र जेवण सोबत केलं. साधारणतः दोन वर्षांनंतर अमित शाह आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटले. या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेची आठवण झाली. या बंद दाराआडच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. दिल्लीला गेल्यानंतर या दोघांनी एकत्र जेवण सोबत केलं. साधारणतः दोन वर्षांनंतर अमित शाह आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटले. या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेची आठवण झाली. या बंद दाराआडच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.

बंद दाराआडची चर्चा आणि महाराष्ट्राचं राजकारणच बदललं..

2019 मध्ये उद्धव ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची मातोश्रीवर भेट झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शाह या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बंद दाराआडच्या चर्चेनेच महाराष्ट्रातली समीकरणं बिघडणार आहेत किंवा बंद दाराआडची चर्चाच त्याची नांदी ठरणार आहे असं त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देणारी ही बंद दाराआडची चर्चाच ठरली. या बंद दाराआडच्या चर्चेत नेमकी काय वचनं घेतली गेली त्याचे संदर्भ अजूनही कुणाला कळलेले नाहीत. पण दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांनी आपण काय बोललो होतो हे सांगितलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp