अमरावती हिंसाचार : चिथावणी देणाऱ्या 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती; वाचा काय आहे पोस्टमध्ये?

सौरभ वक्तानिया

त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या कथित मशिदीच्या तोडफोडीची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या अमरावती, मालेगाव या शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. सर्वाधिक पडसाद उमटले ते अमरावतीत. या प्रकरणी आता 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेड या शहरांमध्ये जो हिंसाचार घडला त्यासाठी या पोस्ट कारणीभूत ठरल्या होत्या. या सगळ्या पोस्ट चिथावणी देणाऱ्या आहेत असं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या कथित मशिदीच्या तोडफोडीची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या अमरावती, मालेगाव या शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. सर्वाधिक पडसाद उमटले ते अमरावतीत. या प्रकरणी आता 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेड या शहरांमध्ये जो हिंसाचार घडला त्यासाठी या पोस्ट कारणीभूत ठरल्या होत्या. या सगळ्या पोस्ट चिथावणी देणाऱ्या आहेत असं सायबर शाखेच्या पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे या पोस्टमध्ये?

एकूण 36 पैकी 25 पोस्ट ट्विटरवर आहेत. सहा पोस्ट फेसबुक आणि इतर पाच पोस्ट ट्विटरवर आहेत. या पोस्टमुळेच हिंसाचार पेटला. सायबर सेलने यासंदर्भातला अहवाल सादर केला आहे. या मध्ये नमूद करण्यात आलं आहे की हिंसाचार माजवण्यासाठी. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे चुकीचा प्रोपगंडा राबवला गेला. या सगळ्या पोस्टमधून चिथावणी देण्यात आली होती ज्यामध्ये हिंसाचार उसळला.

अमरावती हिंसाचार प्रकरण : भाजपा नेते प्रवीण पोटेंसह दहा जण शरण; पोलिसांनी केली अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp