एपीजे अब्दुल कलाम पुण्यतिथी: ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं होतं?

मुंबई तक

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (Apj Abdul Kalam) ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातं. यांच 27 जुलै 2015 रोजी आयआयएम शिलॉंग येथे व्याख्यान देताना निधन झालं होतं. राष्ट्रपती म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 दरम्यान भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं. 27 जुलै 2015 रोजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (Apj Abdul Kalam) ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातं. यांच 27 जुलै 2015 रोजी आयआयएम शिलॉंग येथे व्याख्यान देताना निधन झालं होतं. राष्ट्रपती म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 दरम्यान भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं.

27 जुलै 2015 रोजी आयआयएम शिलॉंगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना कलाम मंचावर पडले. त्यांना तात्काळ शहरातील एका रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता असं म्हटलं जात आहे. जाणून घेऊया त्या दिवशी नेमकं झालं होतं तरी काय.

आयआयएम शिलॉंगचे तत्कालीन संचालक सांगतायेत ‘त्या’ दिवसाबाबत

आयआयएम शिलॉंगचे तत्कालीन संचालक अमिताभ डे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संस्थान डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना माजी राष्ट्रपतींपेक्षा शिक्षक म्हणून अधिक पाहत होतं. सर्वसाधारणपणे आयआयएम व्यवस्थापन आणि सामाजिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करतात. डॉ. कलाम हे मूळत: शास्त्रज्ञ असल्याने आम्ही राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि मानवतावाद या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.

हे वाचलं का?