बिहारचा वचपा भाजपने ईशान्येत काढला : नितीशकुमारांचा अख्खा पक्षच संपवला…

मुंबई तक

इटानगर : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) पक्षाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपला धक्का देवून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले होते. भाजप प्रादेशिक पक्ष संपवत आहे, त्यामुळे भाजपसोबतची युती तोडावी अशी सर्व आमदार आणि खासदारांची मागणी होती, असा दावा नितीशकुमार यांनी केला होता. त्यानंतर आता भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीशकुमार यांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इटानगर : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) पक्षाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपला धक्का देवून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले होते. भाजप प्रादेशिक पक्ष संपवत आहे, त्यामुळे भाजपसोबतची युती तोडावी अशी सर्व आमदार आणि खासदारांची मागणी होती, असा दावा नितीशकुमार यांनी केला होता.

त्यानंतर आता भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीशकुमार यांना मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमधील जेडीयुच्या उरलेल्या एकमेव आमदारानेही आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता २०१९ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या जेडीयुचे सर्व आमदार आता भाजपवासी झाले आहेत.

होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

२०१९ च्या विधानसभा अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयुने १५ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी त्यांचे ७ आमदार निवडून आले होते. त्यापैकी ६ आमदारांनी डिसेंबर २०२० मध्ये भाजपचा झेंडा हातात घेतला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp