बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ फॉर्म्युल्यावरच उद्धव ठाकरे पुन्हा करत आहेत शिवसेनेची उभारणी

मुंबई तक

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना हा पक्ष चर्चेत आहे. हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दुभंगला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. आता एकनाथ शिंदे गट शिवसेनेवर दावा सांगतो आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेना वाचवण्याची आणि पुनर्बांधणी करण्याची जोरदार तयारी करत आहेत. यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना हा पक्ष चर्चेत आहे. हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दुभंगला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. आता एकनाथ शिंदे गट शिवसेनेवर दावा सांगतो आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेना वाचवण्याची आणि पुनर्बांधणी करण्याची जोरदार तयारी करत आहेत. यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०-२० च्या फॉर्म्युलाचा आधार घेत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दुभंगली

शिवसेनेतून ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी बंड पुकारलं आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दादा भुसे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई असे दिग्गज नेते आहेत ज्या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. या आमदार खासदारांमध्ये ठाणे, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातले नेते आहेत. अशात आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते पक्ष मजबूत करण्याचं.

शिवसेनेला शिंदे गटापासून वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई तर लढली जातेच आहे, मात्र त्याचसोबत रस्त्यावर उतरूनही संघर्ष केला जातो आहे. ठाकरे गटाने त्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतून बाहेर पडून महाराष्ट्राचा दौरा करत आदित्य ठाकरे पुन्हा एकदा जोमाने शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात भिवंडी ते शिर्डी पर्यंत शिवसंवाद यात्रा काढली. यामध्ये त्यांनी ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दौरा केला. आता त्यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

आदित्य ठाकरे हे मुंबईबाहेर पडून शिंदे गटाला आव्हान देत आहेत. अत्यंत आक्रमक होत आदित्य ठाकरे सध्या शिवसेना बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत. त्यांची भाषणं याचीच प्रचिती देत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp