Uddhav Thackeray: मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे

ऋत्विक भालेकर

मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे, भाजप आणि एकनाथ शिंदे तसंच शिंदे गटावर कडाडून टीका केली. राज ठाकरे यांचा उल्लेख मे महिन्यात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मुन्नाभाई असा केला होता. तोच शब्द आज परत वापरत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली. तसंच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे, भाजप आणि एकनाथ शिंदे तसंच शिंदे गटावर कडाडून टीका केली. राज ठाकरे यांचा उल्लेख मे महिन्यात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मुन्नाभाई असा केला होता. तोच शब्द आज परत वापरत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली. तसंच भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी?

भाजप भ्रष्टाचार संपवण्याच्या गोष्टी करतो आहे. त्यांच्याकडे काही मशीन वगैरे आहे का? कारण भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर केले त्यांनाच सोबत घेतलं आहे. राज्यात समस्या आहेत आणि मुख्यमंत्री फिरत आहेत. आज दिल्ली त्या आधी सुरत, गुवाहाटी, गोवा हे सगळं फिरतं सरकार आहे. कसा कारभार चाललाय कुणालाच माहित नाही.

शिवसेनेला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र येत आहेत

शिवसेनेला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र येत आहेत. मी चार दिवसांपूर्वीच मी बोललो होतो की मी आजच्या दिवसाची वाट बघत होतो. ज्यांना कुणाला अंगावर यायचं आहे या तुम्हाला आस्मान काय असतं ते दाखवतो. या एकत्र या, तुमच्या लक्षात आणून देतो की शिवसेनेची ताकद तुम्हाला कळली नाही, पण विरोधकांना कळली आहे. त्यामुळेच शिवसेना संपवण्यासाठी आपल्यातल्या गद्दारांना सोबत घेतलं आहे, मुन्नाभाई सोबत घेतलाय. सगळे एकत्र कशासाठी येत आहेत तर उद्धव ठाकरेला संपवा, ठाकरे घराणं संपवा आणि शिवसेना संपवा. हे समोर बसलं आहे ते माझं ठाकरे कुटुंब आहे संपवा. प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील माझ्या शिवसैनिकांची मनं थिजलेली नाही.

शिवसेना कधी कुणीही चिरडू शकत नाही

शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेला ढेकूण किंवा झुरळ नाही कुणीही आलं आणि चिरडून गेलं. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप, शिंदे गट आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करू नका. जर संघर्ष झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यात होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल आणि कमळाबाईचे कपडे साफ राहतील मला तो त्यांचा डाव साधायचा नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp