Tanushree Dutta : “मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार”

मुंबई तक

मला काहीही झालं तर त्या गोष्टीसाठी नाना पाटेकर जबाबदार असतील अशी पोस्ट अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तनुश्री दत्ताने तिच्या इंस्टाग्राम पेजवर ही पोस्ट लिहिली आहे. भारतात #MeToo ची मोहीम तनुश्री दत्ताने सुरू केली. तिने नाना पाटेकर या अभिनेत्याने माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची बरीच चर्चा […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मला काहीही झालं तर त्या गोष्टीसाठी नाना पाटेकर जबाबदार असतील अशी पोस्ट अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तनुश्री दत्ताने तिच्या इंस्टाग्राम पेजवर ही पोस्ट लिहिली आहे. भारतात #MeToo ची मोहीम तनुश्री दत्ताने सुरू केली. तिने नाना पाटेकर या अभिनेत्याने माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. तसंच अनेक अभिनेत्रींनी समोर येत त्यांच्यासोबत काय घडलं होतं तेही सांगितलं होतं. आता तनुश्री दत्ताची नवी पोस्ट चर्चेत आहे.

काय म्हटलं आहे तनुश्री दत्ताने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये?

जर मला काहीही झालं तर त्यासाठी नाना पाटेकर, त्याचे वकील, त्याचे सहकारी आणि त्याचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. बॉलिवूड माफिया कोण? हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. हे ते लोक आहेत जे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात होते. त्यांची नावं सातत्याने समोर येतात तेच लोक आहेत असं उत्तरही तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये दिलं आहे.

नाना पाटेकरचे चित्रपट पाहू नका, तसंच त्याच्या बॉलिवूड माफिया मित्रांचेही चित्रपट पाहू नका. या सगळयांवर बहिष्कार टाका. प्रत्येकजण त्यांच्या मागे लागा आणि त्यांना जाब विचारा. त्यांचं आयुष्य नरक झालं पाहिजे ही आता समाजाची जबाबदारी आहे. या लोकांनी मला प्रचंड त्रास दिला आहे. कायदा आणि न्यायव्यवस्था अपयशी ठरली असली तरीही माझा या महान देशातील लोकांवर पूर्णतः विश्वास आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp