मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या मंत्र्याचं CM ठाकरेंकडून कौतुक

मुंबई तक

मुंबई: आपल्या मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) प्रचंड कौतुक केलं आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत एकूण माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचं आपल्या भाषणात खूप कौतुक केलं. गेले काही महिने कोरोनाची रुग्णसंख्या ही कमी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: आपल्या मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) प्रचंड कौतुक केलं आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत एकूण माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचं आपल्या भाषणात खूप कौतुक केलं.

गेले काही महिने कोरोनाची रुग्णसंख्या ही कमी झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवले होते. त्यामुळे लग्न समारंभ असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ लागले होते. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे लग्न सोहळे कमीत कमी माणसांमध्ये करण्यात यावेत असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान, राज्याच्या उर्जामंत्र्यांनी आपल्या मुलाचा लग्न सोहळाचा रद्द करण्याचा निर्णय घेऊन राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

जरुर वाचा: अमरावतीत उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन, पालकमंत्र्यांची घोषणा

‘याला म्हणतात सामाजिक जाणीव’

हे वाचलं का?

    follow whatsapp