निसर्ग चक्रीवादळानंतर जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये एवढीच अपेक्षा: फडणवीस
सिंधुदुर्ग: ‘उद्या मुख्यमंत्री कोकणात येत आहेत, तर त्यांनी भरघोस मदत जाहीर करावी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘तौकताई चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील मच्छीमार, आंबा, काजू बागायतदार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या घराचे, बोटींचे मोठे नुकसान […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग: ‘उद्या मुख्यमंत्री कोकणात येत आहेत, तर त्यांनी भरघोस मदत जाहीर करावी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
‘तौकताई चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील मच्छीमार, आंबा, काजू बागायतदार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या घराचे, बोटींचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीसाठी जिल्ह्यात दाखल होत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची घोषणा करून त्याची तात्काळ पूर्तता करावी.’ अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तौकताई चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची ते स्वत: वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत.
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, भाजपचे माजी आमदार राजन तेली हे सर्व नेते होते. या दौऱ्यात भाजपच्या या नेत्यांनी अनेक ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या आणि नेमकं कशा स्वरुपाचं नुकसान झालं आहे याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची देखील भेट घेतली.
?Sindhudurg | सिंधुदुर्ग.
निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी हेक्टरी 50 हजार म्हणजे एका झाडाला 500 रूपये मदत घोषित केली होती.
उद्या मुख्यमंत्री कोकणात येत आहेत, तर त्यांनी भरघोस मदत जाहीर करावी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. pic.twitter.com/j1KOwk7dIR— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 20, 2021
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे बहुतांशी घटकांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासन आणि सरकार कमी पडले याकडेही विविध मुद्द्यांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांचे या नेत्यांनी लक्ष वेधले. देवगड तालुक्यात नांगरून ठेवलेल्या बोटी भरकटत जाऊन त्यांचे नुकसान झाले असून दुसरीकडे बोटीवरील खलाशी मृत्युमुखी पडल्याची बाबही गंभीर असून त्यावेळी कोस्ट गार्ड यंत्रणा तैनात असती तर खलाशी मृत्युमुखी पडले नसते. हे जीव वाचविता आले असते याकडे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.