Nashik oxygen leakage: मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आर्थिक मदत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: नाशिकच्या (Nashik) डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती (Oxygen leakage) झाल्याने तब्बल 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू (22 Patients Death) झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे की, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत करण्यात येईल.

दुसरीकडे अशीही माहिती समोर आली आहे की, नाशिक महापालिकेच्या वतीने देखील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘माझी आई तडफडून मेली, अख्ख्या वॉर्डमधील सगळे पेशंट संपले’, नातेवाईकांचा आक्रोश

पाहा मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक प्रस्तावात काय म्हटलं आहे:

ADVERTISEMENT

महाराष्ट्र शोकमग्न आहे- मुख्यमंत्री

ADVERTISEMENT

‘कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरु आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करती असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वत:ला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करु? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरीह मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.

या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करु नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

—–

नाशिकच्या रूग्णालयात Oxygen ची गळती, 22 जणांचा मृत्यू

‘या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत.’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केलं आहे.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला, या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकवणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोव्हिडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत असा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करुन चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वी आणि डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे.

कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सूचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.

यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT