“राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी” गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यातले दहा ठळक मुद्दे
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासहीत सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. G23 मध्ये सहभागी असलेले गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. सध्याचं काँग्रेस रिमोटवर चालणारं आहे असंही त्यांनी यात म्हटलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातो आहे. गुलाम […]
ADVERTISEMENT

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासहीत सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. G23 मध्ये सहभागी असलेले गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. सध्याचं काँग्रेस रिमोटवर चालणारं आहे असंही त्यांनी यात म्हटलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातो आहे.
गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या पत्रातले ठळक दहा मुद्दे काय आहेत?
१) गुलाम नबी आझाद यांनी आपल्या राजीनाम्याच्या पाच पानी पत्रात राहुल गांधी यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी हे त्यांच्या जवळपास गैर अनुभवी लोकांना बाळगून आहेत त्यांनी वरिष्ठ नेत्यांना साईडलाईन केलं आहे अशी गंभीर तक्रार आझाद यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्यावर आधीही पार्टटाइम राजकारणी असल्याचा आरोप लागला आहे. आता आझाद यांच्या पत्रातही राहुल गांधींना टार्गेट करण्यात आलं आहे.
२) काँग्रेसने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला चालवणाऱ्या राष्ट्रीय कार्यसमितीने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्ही हरवलं आहे
३) काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मात्र काँग्रेसला आधी काँग्रेस जोडो यात्रा सुरू करण्याची गरज होती.










