Unlock च्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Unlock च्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी Unlock संदर्भातली घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. विजय वडेट्टीवर यांनी राज्यातील 18 जिल्ह्यांमधले सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत अशी घोषणा केली, ज्यानंतर गुरूवारी गोंधळ उडाला. सगळे निर्बंध शिथील झाल्याचं चित्र निर्माण झालं. पण […]
ADVERTISEMENT

Unlock च्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी Unlock संदर्भातली घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. विजय वडेट्टीवर यांनी राज्यातील 18 जिल्ह्यांमधले सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत अशी घोषणा केली, ज्यानंतर गुरूवारी गोंधळ उडाला. सगळे निर्बंध शिथील झाल्याचं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं. या सगळ्या गोंधळावर विरोधकांनी टीका केली. तर आता अजित पवार यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Confusion over Lockdown: लॉकडाऊन हटवण्याबाबत प्रचंड मोठा गोंधळ, सरकार म्हणतं अजून लॉकडाऊन हटवलेला नाही!
काय म्हणाले अजित पवार?
Unlock बाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी कोरोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपेही भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवर यांच्याकडून तत्वतः एवढा एक शब्द राहून गेला त्यामुळे गैरसमज झाला. शेवटी सरकार कुणाचंही असलं तरीही राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय अंतिम असतो असं सांगत अजित पवार यांनी या सगळ्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे.










