औरंगाबादमध्ये ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा
महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरांना सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच विळखा बसला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद अशा अनेक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडते आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मध्ये स्थानिक प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबदमध्ये या गोष्टी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरांना सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच विळखा बसला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद अशा अनेक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडते आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मध्ये स्थानिक प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबदमध्ये या गोष्टी असतील पूर्णपणे बंद –
१) कोणत्याही परिस्थितीत ५ पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणांमध्ये एकत्र येण्यास मनाई
२) सार्वजनिक किंवा खासगी मैदानं, मोकळ्या जागा, बाग-बगिचे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इव्हिनींग वॉकला येण्यासही मनाई करण्यात आली आहे.