Russia-Ukraine Conflict : हुश्श! विमान मुंबईत उतरताच विद्यार्थ्यांनी टाकला सुटकेचा निःश्वास
रशिया आणि य़ुक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. रशियाने युक्रेनच्या महत्वाच्या शहरांना आपला निशाण बनवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपलं राहतं घर सोडून बंकर, मेट्रो स्टेशनवर रहावं लागतं होतं. त्यातच युक्रेनने आपली विमानसेवा बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचा भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेरीस केंद्र सरकारच्या […]
ADVERTISEMENT

रशिया आणि य़ुक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. रशियाने युक्रेनच्या महत्वाच्या शहरांना आपला निशाण बनवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपलं राहतं घर सोडून बंकर, मेट्रो स्टेशनवर रहावं लागतं होतं. त्यातच युक्रेनने आपली विमानसेवा बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचा भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेरीस केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या इतर देशांशी संवाद साधत भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेतली.
या मोहीमेला पहिलं यश आलं असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं पहिलं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं आहे.
Three Cheers For India!
Interacted with the Indian evacuees from Ukraine at the Mumbai airport.
Urged them to convey to their friends back in Ukraine that the Govt. has their back. #OperationGanga pic.twitter.com/45jIuncIWT
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 26, 2022
संध्याकाळी सात वाज पन्नाट मिनीटांनी इअर इंडियाचं AIC 1944 हे विमान मुंबई विमानतळावर दाखल झालं. या विमानात २१९ भारतीय प्रवासी होते ज्यात बहुतांश विद्यार्थी होते. या सर्वांना परराष्ट्र मंत्रालयाने बुखारेस्टची राजधानी हेनरी कोएंदा विमानतळावरुन एअरलिफ्ट केलं. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महापौर किशोरी पेडणेकर या विमानतळावर हजर होत्या.










