सुशांत प्रकरणानंतर मुंबईला म्हटलं गेलं ड्रग्ज कॅपिटल, बघा 3000 किलो ड्रग्स जाणार होतं कुठे?

मुंबई तक

नवी दिल्ली: गुजरातमधील मुंद्रा बंदरात अलीकडेच 3000 किलो अंमली पदार्थ (ड्रग्स) जप्त करण्यात आलं होतं. 30 क्विंटल ड्रग्स एवढा प्रचंड माल जप्त केल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)या संपूर्ण तपासात सक्रिय झालं होतं. डीआरआयने आता या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने दिल्ली आणि नोएडा येथे छापे टाकून दोघांना अटक केली आहे. डीआरआय लखनौ आणि नोएडा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: गुजरातमधील मुंद्रा बंदरात अलीकडेच 3000 किलो अंमली पदार्थ (ड्रग्स) जप्त करण्यात आलं होतं. 30 क्विंटल ड्रग्स एवढा प्रचंड माल जप्त केल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)या संपूर्ण तपासात सक्रिय झालं होतं. डीआरआयने आता या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने दिल्ली आणि नोएडा येथे छापे टाकून दोघांना अटक केली आहे. डीआरआय लखनौ आणि नोएडा युनिट्सने दोन जणांना अटक केली आहे. जे अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्सचा मुद्दा बराच चर्चेत आला होता. त्यावेळी मुंबई म्हणजे ‘ड्रग कॅपिटल’ असं देखील चित्र निर्माण केलं जात होतं. पण आता गुजरातमधील मुंद्र बंदरावर जे 3000 किलो एवढं प्रचंड ड्रग्स सापडलं आहे ते मुंबईत नव्हे तर थेट राष्ट्रीय राजधानी दिल्ली जाणार होतं. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुजरातमधील मुंद्रामध्ये 3000 किलो ड्रग्स ते शिमलातून अटक व्हाया दिल्ली

मिळालेल्या माहितीनुसार, हे अफगाण नागरिक मुंद्रा बंदरातून दिल्लीला ड्रग्स पोहचविण्यातील महत्त्वाचा दुवा होते. या दोघांनाही शिमला येथून अटक करण्यात आली आहे. डीआरआयने मुंद्रा बंदरावर जी कारवाई केली त्यानंतर दिल्लीतून 10 किलो कोकेन, 11 किलो हेरॉईन आणि 38 किलो इतर अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp