हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई तक

हिंमत असेल तर रझा अकदामीवर बंदी घालून दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. अमरावतीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यावर वातावरण त्यावर वातावरण तापवलं गेलं. तिथल्या पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आणखी काय म्हणाले फडणवीस? काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हिंमत असेल तर रझा अकदामीवर बंदी घालून दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. अमरावतीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यावर वातावरण त्यावर वातावरण तापवलं गेलं. तिथल्या पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले फडणवीस?

काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी पोलिसांवर हल्ले का करते? मुंबईत अशा प्रकारची दंगल झाली होती. तेव्हा रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले केले होते. त्यावेळीही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे रझा अकादमी कुणाची बी टीम आहे, कुणीची ए टीम आहे आणि कुणाचं पिल्लू आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला वाटतं ना रझा अकादमी भाजपची बी टीम आहे. तर आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो. आहे का हिंमत? काँग्रेसमध्ये आहे का हिंमत? असा सवाल फडणवीसांनी केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp