कडोंमपा निवडणूक: सावरकरांच्या नावाचा वॉर्ड वगळून सेनेचा विद्यमान आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न

मुंबई तक

– मिथीलेश गुप्ता, डोंबिवली प्रतिनीधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर आता मनसेपाठोपाठ भाजपनेही टीका केली आहे. शिवसेनेने या प्रभाग रचनेत विद्यामान भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या वॉर्डातून रविंद्र चव्हाण पहिल्यांदा नगरसेवर म्हणून निवडून आले तो स्वातंत्र्यवीर सावरकर वॉर्ड यंदाच्या प्रभागरचनेत वगळण्यात आला आहे. २००५ साली रविंद्र चव्हाण या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– मिथीलेश गुप्ता, डोंबिवली प्रतिनीधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर आता मनसेपाठोपाठ भाजपनेही टीका केली आहे. शिवसेनेने या प्रभाग रचनेत विद्यामान भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या वॉर्डातून रविंद्र चव्हाण पहिल्यांदा नगरसेवर म्हणून निवडून आले तो स्वातंत्र्यवीर सावरकर वॉर्ड यंदाच्या प्रभागरचनेत वगळण्यात आला आहे.

२००५ साली रविंद्र चव्हाण या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर आमदारकीचं तिकीट मिळाल्यानंतर २०१० साली अर्चना कोठावदे आणि २०१५ साली संदीप पुराणीक हे या मतदारसंघातून निवडून आले. संघ विचारसरणीचा प्रभाग म्हणून ओळख असलेल्या वॉर्डाची तोडफोड करत यंदा हा वॉर्ड पेंडसेनगर आणि सारस्वत कॉलनी या दोन वॉर्डात विभागण्यात आला आहे.

या प्रभागरचनेवर टीका करताना रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनेने प्रशासनाला हाताशी धरुन आपले जास्तीत जास्त नगरसेवर निवडून आणण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. याचसोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा वॉर्ड प्रभाग रचनेतून वगळल्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टीकाही रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp